आज शिक्षण हे यशाची किल्ली मानले जाते, पण दुर्दैवाने आजही अनेक हुशार विद्यार्थी फक्त पैशांच्या अडचणीमुळे आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. शाळेची फी, कॉलेजची फी, पुस्तके, राहण्याचा खर्च – हे सगळं मध्यम व गरीब कुटुंबांसाठी मोठं ओझं ठरतं.
अशाच विद्यार्थ्यांसाठी Tata Capital Pankh Scholarship ही योजना एक मोठा आधार आहे.
Tata Capital Limited कडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण अभ्यासात चांगले असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
“Pankh” म्हणजे पंख याचा अर्थ असा की अडचणींमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी मदत करणारी योजना.
कोणताही विद्यार्थी फक्त पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये हाच या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.
कोणासाठी आहे ही शिष्यवृत्ती?
ही शिष्यवृत्ती खालील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे:
११वी आणि १२वी मध्ये शिकणारे विद्यार्थी
BA, BCom, BSc सारख्या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी
डिप्लोमा आणि ITI करणारे विद्यार्थी
इंजिनियरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, सायन्स यासारखे प्रोफेशनल कोर्स करणारे विद्यार्थी
म्हणजे शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत जवळजवळ सर्व स्तरांवरच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो.
पात्रता अटी (Eligibility Criteria)
अर्ज करण्यासाठी पुढील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे:
विद्यार्थी भारताचा नागरिक असावा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे (2.5 Lakhs)
मागील शैक्षणिक वर्षात किमान आवश्यक गुण मिळालेले असावेत
मान्यताप्राप्त शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असावा
Tata Capital किंवा Buddy4Study कर्मचार्यांची मुले पात्र नाहीत

शिष्यवृत्तीची रक्कम किती मिळते?
विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्तीची रक्कम ठरते:
११वी–१२वी : फीचा मोठा भाग किंवा ठराविक रक्कम
पदवी / डिप्लोमा / ITI : अधिक आर्थिक मदत
प्रोफेशनल कोर्सेस : ₹1 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती
ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक असतात:
आधार कार्ड / फोटो आयडी
उत्पन्न प्रमाणपत्र
मागील वर्षाची गुणपत्रिका
कॉलेज / शाळेचे प्रवेश प्रमाणपत्र
फी पावती
बँक पासबुक
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अर्ज कसा करायचा?
- Buddy4Study वेबसाइटला भेट द्या
- नोंदणी (मोबाइल / ई-मेल) करा
- अर्ज फॉर्म नीट भरा
- सर्व कागदपत्रे अपलोड करा
- फॉर्म सबमिट करा
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि सोपी आहे.
आज अनेक विद्यार्थी “पैसे नाहीत” म्हणून शिक्षण सोडतात. ही शिष्यवृत्ती त्यांना आत्मविश्वास देते, आधार देते आणि पुन्हा स्वप्न पाहण्याची ताकद देते.
ही फक्त आर्थिक मदत नाही, तर भविष्य घडवणारी संधी आहे.
तुम्ही गरजू विद्यार्थी असाल आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असेल, तर ही संधी सोडू नका.
आजच Tata Capital Pankh Scholarship साठी अर्ज करा आणि आपल्या शिक्षणाला नवी दिशा द्या.
FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1. ही शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते का?
Ans- हो, पात्रतेनुसार दरवर्षी अर्ज करता येतो.
Q2. पैसे कधी मिळतात?
Ans- निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर थेट बँक खात्यात.
Q3. ग्रामीण भागातील विद्यार्थी अर्ज करू शकतात का?
Ans- हो, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील विद्यार्थी पात्र आहेत.
Q4. एकाच वेळी दुसरी शिष्यवृत्ती घेतली तर चालेल का?
Ans- काही वेळा चालते, पण अटी वाचणे गरजेचे आहे.
